Ad will apear here
Next
देवरुखे ब्राह्मण परिषद ठरली पर्यावरणस्नेही
डॉ. चंद्रशेखर निमकररत्नागिरी : रत्नागिरीत नुकतीच झालेली जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद अनेक अर्थांनी चांगल्या प्रकारचा पायंडा पाडणारी ठरली. प्लास्टिकमुक्ती, प्रदूषण टाळणे, स्वच्छता करणे या बाबतींमध्ये या परिषदेचे आयोजक आणि कार्यकर्त्यांनी कृतीतून आदर्श घालून दिला आणि एखादा मोठा कार्यक्रम पर्यावरणस्नेही आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कसा होऊ शकतो, हे दाखवून दिले. 

रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडासंकुलात १५ आणि १६ डिसेंबर २०१८ रोजी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी संमेलनस्थळी आर. सी. काळेनगरी उभारण्यात आली होती. कार्यक्रमानंतर सर्व कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छता करावी, अशी सूचना परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी केली होती. त्याचे तंतोतंत पालन कार्यकर्त्यांनी केले. त्यामुळे परिषद झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच परिसर स्वच्छ झाला.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याच्या, तसेच प्लास्टिक बाटल्या इतस्ततः न फेकण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या. त्याचे बहुतांशी पालन झाले. तसेच कार्यक्रमानंतर परिसराची स्वच्छता केल्याने नगर परिषदेचा कामाचा भार हलका झाला.

तसेच, परिषदेच्या निमित्ताने काढलेल्या शोभायात्रेत कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण टाळले गेले. शोभायात्रेच्या एखाद्या मार्गावरून गेल्यानंतर काही कचरा झाला असल्यास पाठीमागे असलेल्या स्वच्छता पथकातील कार्यकर्ते तो कचरा लगेच उचलत होते. हा एक वेगळ्या प्रकारचा पायंडाच म्हणायला हवा.
परिषदेच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी १०० जणांनी रक्तदान केले. परिषदेतील मुख्य कार्यभागाबरोबरच या सगळ्या उपक्रमांनाही परिषदेत सहभागी झालेल्या ज्ञातीबांधवांनी सक्रिय सहकार्य केल्याबद्दल परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी आनंद व्यक्त केला. 

परिषद यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी सहायक संस्थेचे विश्वस्त, कार्यकारिणी, देवरुखे विद्यार्थी वसतीगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी व कार्यकारिणीचे मोलाचे योगदान लाभल्याचे डॉ. निमकर यांनी सांगितले. ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने या संमेलनाचे वार्तांकन केल्याबद्दल डॉ. निमकर यांनी विशेष आभार मानले.

(डॉ. निमकर यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. या परिषदेचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZOTBV
Similar Posts
नवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत रत्नागिरी : ‘जग झपाट्याने बदलत आहे. चौथी औद्योगिक क्रांती होत आहे. २० वर्षांनंतर ५० टक्के नोकऱ्या इंटरनेटवर आधारित असतील. ऑफिस ही संकल्पना आता कमी होत जाणार आहे. त्यामुळे काळानुरूप शाळा-महाविद्यालयांतही डेटा, थ्रीडी प्रिंटिंग, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजेत,’ असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ
जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद रत्नागिरीत रत्नागिरी : महाराष्ट्रासह देश-विदेशातील सर्व देवरुखे ब्राह्मण समाजाचे आकर्षण असणारी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद १५ व १६ डिसेंबरला रत्नागिरीत होणार आहे. शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या परिषदेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. बंदररोड येथील देवर्षीनगरात नुकतीच आढावा बैठक झाली. या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते
‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language